Saturday, July 12, 2014

मनाक्षरे...


मनाक्षरे...

आपलं मन हे खरोखरच थक्क करणारं माध्यम. होय माध्यम..कारण, येथे विचारांचे तरंग कायम उमटत असतात. त्यांच्या जवळ जाऊ शकतात, त्यांच्याशी त्यांचा संवाद होतो. आयुष्यात साचलेपण आल्याची भावना झुगारून देणारे सामर्थ्य मनात असतं आणि त्याचवेळी आयुष्यात साचलेपण आणण्यासही तेच कारणीभूत असतं.. कायम भीती आणि भिंती यांच्यात गुदमरण्याची सवय असणाऱ्या आपल्या जगण्यातला आनंद शोधायचा असेल तर मनाची भाषा, त्याची विरामचिन्हे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे मनही उलगता आले पाहिजे. स्वतःच्या मनाची भाषा एकदा का लक्षात आली की इतरांची मनेही सहज ओळखता येतात. मनात कायम निनादत असणाऱ्या भावभावनांतील हळवे तरंग अक्षरांच्या माध्यमातून मनापासून जपणे, जोपासणे ही खरोखरच अद्वितीय अनुभूती ठरते. म्हणूनच, मनाचीही स्वतःची अशी एक भाषा, ती व्यक्त करु पाहणारी अक्षरे, त्यांतून उलगडणारी विविधरंगी अर्थ यांच्या अवकाशात विहरणे सर्वांनाच शक्य होते असे नाही...तरीही आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? 

No comments:

Post a Comment